Pawan/पवन
Pawan/पवन

@thepawanupdates

12 Tweets 4 reads Apr 14, 2022
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे निमित्त साधत 14 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीसांचे 14 ट्विटस आणि खासदार श्री शरद पवारजींच्या दुटप्पी राजकारणाचा पर्दाफाश.
या थ्रेडच्या माध्यमातून अनुनयाच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना करून अनेक बाबींचे स्मरण
देवेंद्रजींनी करून दिले.
आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून देताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर केले देवेंद्रजींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
wap.business-standard.com
काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या शरद पवारांनी करलरल्या विधानाचे स्मरण देवेंद्रजींनी करून दिले.
hindustantimes.com
इतकेच नव्हे तर इशरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाची सुद्धा आठवण त्यांनी करून दिली.
news18.com
सोबतच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख त्यांनी आपल्या थ्रेडमध्ये केला आहे.
indiatoday.in
2012 मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख त्यांनी केला.
संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला? असाही सवाल त्यांनी विचारला.
indiatoday.in
अल्पसंख्यांक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, या विधानाचे सुद्धा त्यांनी स्मरण करून दिले.
deccanherald.com
'हिंदू टेरर' (हिंदू दहशतवाद) हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत निशाणा पवार साहेबांवर साधला.
m.jagran.com
सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख त्यांनी केला.
firstpost.com
मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे पवारांनी खोटे सांगितल्याच्या बाबीची सुद्धा त्यांनी आठवण करून दिली.
indiatoday.in
काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून? असाही सवाल त्यांनी केला.
काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय
विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही, असे म्हणत त्यांनी आपला आजचा थ्रेड संपविला.
जय महाराष्ट्र.

Loading suggestions...